ताज्या बातम्या

Vinayak Raut : कपटी लोकांची साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत म्हणाले की, विजय तर मिळवायचा आहे पण एवढ्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देणाऱ्यांचे उपकार पुन्हा एकदा जनसेवेच्या माध्यमातून मला फेडायचे आहेत. याचं भान मी मनामध्ये ठेवून वागतो आहे. रत्नागिरीमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा होईल. ते विजयाचा पहिला पुकार त्या रत्नागिरीच्या सभेतून करतील. 3 मेला कणकवलीच्या सभेमध्ये ते माझ्या विजयावर शिक्कामोर्तब करतील.

आज मुंबई गुजरातला जोडण्याचे कपट कारस्थान चाललं असताना मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याचे कपट कारस्थान चाललं असताना या गद्दारांच्या माध्यमातून धनुष्यबाण संपवण्याचे कपट कारस्थान चाललं असताना. अशा या कपटी लोकांची साथ देण्यासाठी मनसे जर पुढे येत असेल तर लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.

तसेच विनायक राऊत पुढे म्हणाले की, विनायक राऊत हा मंत्रीपदासाठी हापापलेला नाही. विनायक राऊत सत्तेसाठी लाचार झालेला माणूस नाही आहे. माझी निष्ठा आणि माझी श्रद्धा माझ्या पक्ष नेतृत्वाबरोबर आणि माझ्या मतदारसंघातील मतदारांची ही माझ्यासाठी खूप मोठी आहे. मंत्री म्हणून काय दिवे लावले? जे 35 वर्षात तुम्ही काही केलं नाही. ते आता काय करणार आहात. या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं गद्दारांचं सरकार पूर्णपणे बरखास्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल. असं विनायक राऊत म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...