ताज्या बातम्या

वर्धा जिल्ह्यातील कारंजात चार दुकाने जळून खाक; 20 लाखांचे नुकसान

वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे आज पहाटेच्या सुमारास चार दुकानाला आग लागली.

Published by : Siddhi Naringrekar

भूपेश बारंगे, वर्धा :

वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे आज पहाटेच्या सुमारास चार दुकानाला आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. या आगीत जवळपास 10 ते 20 लाखाचे नुकसान झाले आहेय. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जागेवर वसलेले दुकानात अचानक आग लागली. दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाल्याने यांचे दहा लाखापेक्षा नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या आगीमध्ये मोठं नुकसान झाले आहे. दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. याठिकाणी पान टपरी, पेढ्याचा दुकान, पत्रावळीचे दुकानाचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही. पहाटेपासून लागलेल्या आगीत सकाळी साडे आठ वाजेपर्यंत आग विझवण्याच्या प्रयत्न सुरू आहे. यावरून आगीचे रौद्ररूप लक्षात येते. चार दुकानात आग लागल्याचे समजताच नागरिकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. यावेळी अनेक नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळी कारंजा पोलीस दाखल झाले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर