ताज्या बातम्या

'आता हिशेब होणार, बदला घेणारच...' जरांगे पाटलांचा इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवली सराटीत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे आणि मराठा समाज बांधव विधानसभा लढायची की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत.

Published by : shweta walge

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवली सराटीत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे आणि मराठा समाज बांधव विधानसभा लढायची की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत. या बैठकीपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केला आहे. आम्हाला संपवण्यास निघालेला आम्ही संपवणार म्हणजे संपवणार आहे. मग त्यासाठी कोणतीही प्रक्रिया असा इशारा त्यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, आमची सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील संधी हिरावून घेतली. आता हिशेबच होणार आहे. बदलाच घेणारच आहोत. आमचे सुख या सरकारला पाहता आले नाही. हा आनंद हिरवून घेणाऱ्यास आता सोडणार नाही. आमच्या हाततोंडाला आलेला घास काढला. आमचा हातही छटला आणि घासही काढला. सुडबुद्धीने आम्हाला मिळत असलेले आरक्षण काढून घेतले, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना काहीच अधिकार नसताना त्यांनी आमचे बळी घेतले. शेवटी आमच्या नाकावर टिच्चून ओबीसींच्या काही जाती आरक्षणात घातल्या. परंतु मराठ्यांना काही दिले नाही. मराठ्यांचे मुले मोठे होऊ नये, या भूमिकेतून ते उतरले. आता त्यांची वाट लावल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल ती करु.

आमचा समाजाला इतके टार्गेट करण्याची गरज नव्हती. सरकारने आमच्या समाजाची मने दुखवली आहे. सरकारने सूडबुद्धीने वार करत आरक्षण हिरावून घेतले आहे. त्यांनी जाती जातीत खून्नस लावून दिली. ते अत्यंत क्रूर आहेत. जातीत जातीत त्यांनी विष पेरले आहे. आता त्यांचा पडाव मराठा लोकच करणार असल्याच जरांगे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ind vs Eng 3rd Test Match : इंग्लंडनं 22 धावांनी सामना जिंकला; जडेजा-सिराजची झुंज अपयशी, इंग्लंड संघ 2-1 नं आघाडीवर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारताने गमावला; इंग्लंड 22 धावांनी जिंकली

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या व्हिडिओ काढण्यासंबंधीत 'त्या' विधानामुळे वादंग; मिश्रा, शर्मा, राय या वकिलांची महासंचालकांकडे तक्रार

Jio New Plans : युजर्ससाठी Jio चा नवीन 84 दिवसांचा प्लॅन; जाणून घ्या फायदे