ताज्या बातम्या

मुंबईवर पाणीटंचाईचे संकट; धरणांमध्ये केवळ 'इतका' टक्के पाणीसाठा

उन्हाचा कडाका वाढला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून केवळ 25 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तानसा, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी 3900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

सात धरणांमध्ये मिळून एकूण 25.28 टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक भागांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांना सेबीकडून क्लीन चिट

Rohit Pawar : "कोर्टाची नोटीस मिळाल्यानंतर पाऊल उचलणार", कोकाटेंनी दिलेल्या मानहानीच्या नोटीसवर रोहित पवारांचं वक्तव्य

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश