ताज्या बातम्या

मुंबईवर पाणीटंचाईचे संकट; धरणांमध्ये केवळ 'इतका' टक्के पाणीसाठा

उन्हाचा कडाका वाढला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून केवळ 25 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तानसा, मध्य वैतरणा, ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी 3900 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो.

सात धरणांमध्ये मिळून एकूण 25.28 टक्के पाणीसाठा शिल्लक असून अनेक भागांमधील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे मुंबईकरांची जलचिंता वाढली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा