ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पाणी कपातीचे संकट, धरणातील पाणीसाठी 28 टक्क्यांवर

उन्हाचा कडाका वाढला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक जिह्यांमध्ये पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

मुंबईच्या 7 तलावांमध्ये सध्या 28 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत असून मुंबईवर पाणीकपातीचं संकट आहे. सातही धरणांत 4 लाख 11 हजार 355 दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईत भातसा, मोडक सागर, तानसा, विहार, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी ही सात धरणं आहेत. या धरणांमधून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. जेव्हा पाणीसाठा जास्त प्रमाणात कमी होईल त्यावेळी भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातून हा साठा घेण्यात येणार असल्याचे जल अभियंता विभागाने सांगितल्याची माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा