ताज्या बातम्या

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा हायवेचे काम रखडण्याला जबाबदार कोण? उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई-गोवा हायवेचं काम रखडल्याचं खापर कंत्राटदारांवर फोडण्यात आलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबई-गोवा हायवेचं काम रखडल्याचं खापर कंत्राटदारांवर फोडण्यात आलं आहे. पळपुट्या कंत्राटदारांमुळं हायवेचं काम रखडलं असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. हायवे रखडण्याला आतापर्यंतची सगळी सरकारं जबाबदार आहेत असं देखीस उदय सामंत म्हणालेत.

सरकार आलं असं म्हणण्यापेक्षा सरकार अनेकवेळा आलेलं होतं. मला असं वाटतं की मुंबई - गोवा महामार्ग कामाची सुरुवात 2012ला झाली. ज्याप्रकारे कंत्राटदार त्या संपूर्ण प्रकल्पामध्ये होते त्या कंत्राटदारानी पळपुटी भूमिका घेतली म्हणून हा प्रकल्प मागे राहिला आहे आणि याच्यामध्ये एकच सरकार जबाबदार असू शकत नाही.

नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ही संकल्पना निघून गेली आणि केंद्र सरकारच्या 100 टक्के पैशातून करण्याचा हा निर्णय झाला. हे योगदान नक्कीच मोदी सरकरचं आहे आणि निवडणूका आल्यामुळे कदाचित पवार साहेबांना काही इथल्या लोकांनी ब्रिफ केल्यामुळे असल्या पद्धतीचा त्यांचा गैरसमज झाला असेल. परंतू मुंबई - गोवा महामार्ग हा पूर्णत्वाकडे नेण्याची जबाबदारी केंद्र सरकारने घेतलेली आहे आणि या डिसेंबरपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार आहे असे उदय सामंत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा