ताज्या बातम्या

Supriya Sule: "सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का? सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांनी सरकारला विचारले की लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का? 'ग्लोबल महाराष्ट्र' संमेलनात त्यांनी महायुतीवर प्रश्न उठवले.

Published by : Prachi Nate

लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी काल भव्य संमेलन पार पडल. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती.

याचपार्श्वभूमिवर सुप्रिया सुळे यांनी महायुती समोर प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या 2100 रुपयेची वचनपूर्ती करणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2100 रुपये महिलांना देणार असं त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी या बजेटमध्ये करावं. इलेक्शनच्या आधी तुमची एक स्कीम होती, असं काय झालं या इलेक्शनमध्ये की, 5 लाख महिला डिलीट झाल्या. सगळ्यांची फसवणूक किंवा ओव्हर कमिटमेंट झाली".

"तुम्ही प्रत्येक स्कीमला 30 टक्क्यांचा कट दिला आहे, यालाच फिजिकल मॅनेजमेंट म्हणतात. माझी पहिली आणि मोठी अपेक्षा आहे की सरसकट कर्जमाफी व्हावी जो त्यांचा शब्द आहे. सोयाबीन ची बातमी तुम्हीच दाखवली आहे. बाकी कांदा आणि इतर प्रश्न आहेत त्यावर सुद्धा संशोधन झालं पाहिजे. एकवीसशे रुपये महिलांना देणार असं त्यांनी सांगितलं होतं ते त्यांनी या बजेटमध्ये करावं. या अर्थसंकल्पात त्यांनी ते करावं, त्यांनी भाषणात जे सांगितलं तेवढे त्यांनी सर्व करावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत".

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय