ताज्या बातम्या

यशोमती ठाकूर, आव्हाड अन् कांदेंच्या मतावर भाजपचा आक्षेप; मतं अवैध ठरवण्याची मागणी

राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान उडाला गोंधळ

Published by : Sudhir Kakde

मुंबई : भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे सुहास कांदे या तिघांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं भाजपने म्हटलं असून, रिटर्निंग ऑफिसरला त्यांची मतं अवैध ठरवावी अशी मागणी केली आहे. भाजपचे पोलिंग एजंट पराग अलवानी आणि पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केलं होतं. तर पुढच्या काही तासांतच या निवडणुकांचे निकाल समोर येतील. विशेषत: शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांचे देव तोवर पाण्यात असणार आहे.

मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटच्या हातात दिल्यानं भाजपनं आक्षेप घेतला आहे. आमदार मतपत्रिका फक्त पक्षाच्या एजंटला दाखवू शकतात, कुणालाही देऊ शकत नाहीत. मात्र या मतदारांनी एजंटच्या हातात मतपत्रिका दिल्यानं नियमांचं उल्लंघन झालं असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...

Ladki Bahin Yojana : महिला लाभार्थींना दिलासा, ऑगस्ट हप्त्याचा निधी अंतिम टप्प्यात

Crime : पैशासाठी माणुसकीला तिलांजली; जमिनीच्या वादामुळे दोन दिवस मृतदेह अडकला