लोकशाही स्पेशल

आज काय घडले : ऑलिम्पिक समितीची स्थापना

जब्बार पटेल यांचा जन्म, श्यामप्रसाद मुखर्जी यांचे निधन

Published by : Team Lokshahi

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. दर ४ वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

सुविचार

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.

आज काय घडले

  • १७५७ मध्ये प्लॅसी या ठिकाणी मुघल शासक सिराज उदौला व ब्रिटीश यांच्यांत युद्ध झाले. ब्रिटीशांच्या तीन हजार सैन्यांनी मोठ्या फितुरीने सिराज उदौला यांच्या ५० हजार सैन्यांचा पराभव केला.

  • १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली. दर ४ वर्षांनी भरवल्या जाणाऱ्या उन्हाळी व हिवाळी ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्याची जबाबदारी या समितीवर आहे.

  • १९८५ मध्ये दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट झाला. त्यात ३२९ नागरिक ठार झाले होते.

आज यांचा जन्म

  • पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय गांधीवादी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते चंडीप्रसाद भट्ट यांचा १९३४ मध्ये जन्म झाला. त्यांना राष्ट्रीय एकात्मतासाठी इंदिरा गांधी पुरस्कार, गांधी पीस पुरस्कार मिळाला आहे.

  • अर्जुन पुरस्कार विजेता माजी सर्वोत्कृष्ट भारतीय फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक प्रदीप कुमार बॅनर्जी यांचा १९३६ मध्ये जन्म झाला.

  • मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नाट्य व चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांचा १९४२ मध्ये जन्म झाला. ते दहा वर्षाचे असतांना त्यांना नाटकांत काम करण्याची आणि नाट्यदिग्दर्शनाचीही संधी मिळाली.

आज यांची पुण्यतिथी

  • मराठा पेशवा साम्राज्याचे शासक बाजीराव यांचे पहिले चिरंजीव बालाजी बाजीराव पेशवे यांचे १७६१ मध्ये निधन झाले.

  • आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते गिजुभाई बधेका यांचे १९३९ मध्ये निधन झाले. देशांत मॉन्टेसरी शिक्षण पद्धती आणण्याचे श्रेय त्यांना जाते.

  • भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामप्रसाद मुखर्जी यांचे १९५३ मध्ये निधन झाले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते उद्योग व पुरवठा मंत्री होते.

  • इंदिरा गांधी यांचा मुलगा संजय गांधी यांचे १९८० मध्ये विमान अपघातात निधन झाले. ते स्वत:च विमान चालवत असताना अपघात झाला.

  • बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे यांचे १९८२ मध्ये निधन झाले.

  • नाटककार, नाट्यसमीक्षक आणि पदरचनाकार वसंत शांताराम देसाई यांचे १९९४ मध्ये निधन झाले. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली.

  • मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेच्या प्रमुख सिस्टर निर्मला तथा निर्मला जोशी यांचे २०१५ मध्ये निधन झाले. १९९७मध्ये मदर तेरेसा यांच्याकडून या संस्थेचा पदभार घेतल्यावर सिस्टर निर्मला यांनी संस्थेचा प्रभाव १३४ देशांतून पसरविला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद