लोकशाही स्पेशल

Sindhutai Sapkal 2024 Speech In Marathi: सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी भाषण निबंध; जाणून घ्या

सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात.

Published by : Team Lokshahi

Sindhutai Sapkal Death Anniverssary: सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना 2021 मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी ठेवले.पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते याचा त्यावेळी कोणी विचार ही केला नसेल.अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.

सिंधुताई सपकाळ भाषण

विदर्भातील वर्धा जिल्ह्यामधील पिंपरी (मेघे) येथील खेड्यात एका अतिसामान्य कुटुंबात १४ नोव्हेंबर १९४७ रोजी त्यांचा जन्म झाला. मराठी चौथीपर्यंत शिक्षण झालेले असले तरी त्यांची वाचनाची गती विलक्षण! छोटे चुटके, गीत, कविता, शेर यातून त्या विचारमंचावर बसून दोनच मिनिटांत श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतात, ते अनाथांच्या मदतीसाठी, तेही स्वतःचा पदर पसरून! अशा नकोशा, अनाथ मुलांचा सांभाळ करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे, त्यांचे पुनरुत्थान करणे सोपे नव्हते. त्यांना शिक्षण देऊन नोकरी/ कामाला लावून एक चांगला नागरिक बनण्याचे शिवधनुष्य सिंधूताईंनी उचलले.

वयाच्या अकराव्या वर्षी त्या साठेच्या सपकाळ झाल्या. पोटात अंकुर वाढत असताना पती श्रीहरीने त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय घेऊन त्यांना घरातून हाकलून दिले. माहेरही त्यांना पारखे झाले, तेव्हा एका गोठ्यात त्यांनी एका कन्येला जन्म दिला. अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत असताना एकदा तर आत्महत्येचाही विचार माईंच्या मनात आला; पण आपल्या माघारी आपल्या बाळाचे काय? बाळाच्या रडण्यानं त्या भानावर आल्या. सिंधूताईंमधील आई नव्यानं जन्माला आली. आदिवासी, वनवासी यांच्या व्यथावेदनांसोबत माई असंख्य अनाथ मुलांची आई झाली. आईच्या ममतेने त्यांना हृदयाशी घेतलं. ('चिंधी' हे त्यांचं सासरचं नाव.) अनाथ मुला-मुलींना हक्काचे घर आणि आई दोन्ही मिळवून देण्याचे जगावेगळे काम त्यांनी केले.

'दिव्यत्वाची जेथ प्रचिती,

तेथे कर माझे जुळती'

बरीच वर्षे अथक परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिकलदरा येथे पहिले आश्रम बांधले. त्यांनी आश्रमशाळांसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी बरीच शहरे आणि गावे भेट दिली. आतापर्यंत, त्यांनी 1200 मुलांना दत्तक घेतले आहे, जे प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. त्यापैकी बरेच लोक आता प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत.

सिंधुताई सपकाळ मराठी निबंध

सिंधुताई सपकाळ ह्या एक भारतीय समाजसुधारक आहेत. त्यांना “अनाथांची आई” म्हणून ओळखले जाते. भारतातील अनके अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. सन 2016 मध्ये, सिंधुताईंना सामाजिक कार्यासाठी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे साहित्यात डॉक्टरेट पदवी देण्यात आली. भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूपच कठीण आहे. गरीब असो किंवा श्रीमंत त्यांना समाजातील अडचनींना सामोरे जावे लागते. त्यांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे.

समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाळणाऱ्या गरीब कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे त्यांना चिंदीचे कपडे घालावे लागत होते. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. त्यांचे वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत. आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना चौथीपर्यंत शिकता आले आणि नंतर त्यांना शाळा सोडावी लागली.

सिंधुताईंनी आपल्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली. त्यांचे अतिशय संघर्षमय जीवन हे स्वतःचे आणि मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते. जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात सिंधुताई महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिकलदारा येथे आल्या. येथे वाघ संरक्षण प्रकल्पामुळे ८४ आदिवासी गावे रिकामी करण्यात आली. त्यामुळे सिंधुताईंनी असहाय आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना वनमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांना पर्यायी पुनर्वसनासाठी योग्य ती व्यवस्था केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप