लोकशाही स्पेशल

Chhagan Bhujbal : ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यानंतर शक्ती वाढणार, छगन भुजबळांची प्रतिक्रिया

पवार काका-पुतण्यांच्या युतीवर आणि ठाकरे बंधु एकत्र येण्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना आपली रोखठोक भूमिका मांंडली

Published by : Prachi Nate

(Chhagan Bhujbal) मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. भुजबळांना जबाबदारी दिल्याचे शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान आज मंत्री छगन भुजबळ यांनी लोकशाही मराठीसोबत चर्चा केली. दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील हॉट टॉपिकवरही मंत्री छगन भुजबळांनी वक्तव्य केलं आहे. राज्याच्या राजकारणात महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे ही दोन घराणी सर्वात पॉवरफुल्ल असल्याचं ते म्हणाले आहेत.

पण महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही घरात राजकीय फूट पडली असून( Raj Thackeray Uddhav Thackeray together) ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या, आणि(Ajit Pawar Sharad Pawar together) पवार काका-पुतण्यांच्या युतीची चर्चा जोर धरू लागल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर छगन भुजबळ लोकशाही मराठी सोबत बोलताना आपली रोखठोक आणि मिश्कील प्रतिक्रिया देत म्हणाले की, " एक कार्यकर्ता आमचा वाढला की आम्हाला वाटतं की, आमचा पक्ष वाढला. आमच्या पक्षातले लोक जेव्हा गावोगावी जातात, तेव्हा बघतो आम्ही कधी याचा प्रवेश होतो कधी त्याचा प्रवेश होतो यामगचं कारण असं की, पक्षाची शक्ती वाढेल".

"त्यामुळे हे दोन ठाकरे, राज ठाकरेंच तर स्वतःचं कर्तुत्व आहेच ना... आणि उद्धव ठाकरेंनी पण स्वत:च कर्तुत्व सिद्ध केलं आहे. अशावेळी जर हे दोघे एकत्र आले तर निश्चितपणे शक्ती वाढणार. एक साधा कार्यकर्ता आला तरी आम्हाला आनंद होतो. हे तर दोन मोठे नेते आहेत आणि लोकांमध्ये त्यांच प्रेम आहे. जून्या शिवसैनिकाला असं वाटतं की यांनी एकत्र याव". असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा