लोकशाही स्पेशल

Independence Day : 15 ऑगस्ट हीच तारीख भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी का निवडण्यात आली?

१५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

Published by : Siddhi Naringrekar

१५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याची घोषणा झाली. २०० वर्षांच्या गुलामगिरीनंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रजानी भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाइसरॉय असतील असं ठरलं होतं. ब्रिटीश संसदेनं त्यांना ३० जून १९४८ पर्यंत भारताची सत्ता भारतातील लोकांना हस्तांतरित करण्याचा वेळ दिला होता.

लॉर्ड माऊंटबॅटन यांनी याच तारखेची निवड केली कारण, जपाननं मित्र राष्ट्रांच्या फौजांसमोर शरणागती पत्करली त्या गोष्टीला या दिवशी दोन वर्ष पूर्ण होत होती. तर माऊंटबॅटन यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना सांगितलं होतं की, भारतातली परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली होती. त्यामुळे ब्रिटिशांना लवकरात लवकर या देशातून बाहेर पडायचंच होतं.

ब्रिटिशांनी १९४८ साली भारताला स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलं होतं. महात्मा गांधी यांचं 'भारत छोडो' आंदोलन, गांधी आणि जिना यांच्यातील वाद यामुळं माऊंटबॅटन यांच्यावरील सत्ता हस्तांतरणाचा दबाव वाढू लागला होता. त्यामुळं त्यांनी आणखी एक वर्ष वाट पाहण्याऐवजी १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य बहाल केलं आणि तो दिवस होता १५ ऑगस्ट.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद