TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW 
फोटोगॅलरी

Today’s Top Breaking News : आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.

Published by : Varsha Bhasmare
Heavy Rains in Mumbai

गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवामानात सतत बदल दिसत असून, अनेक भागात भारतीय हवामान विभाग (IMD) ने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवसात विविध राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वेटर, छत्र्या आणि पावसापासून बचावासाठी आवश्यक गोष्टी तयार ठेवाव्यात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Maharashtra Farmers

गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवामानात सतत बदल दिसत असून, अनेक भागात भारतीय हवामान विभाग (IMD) ने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवसात विविध राज्यांमध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वेटर, छत्र्या आणि पावसापासून बचावासाठी आवश्यक गोष्टी तयार ठेवाव्यात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका बृहन्मुंबई महानगरपालिका ने 2026–27 साठी इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प — ₹80,952.56 कोटी सादर केला आहे. हे बजेट 25 फेब्रुवारी 2026 रोजी आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे सादर केले. या अर्थसंकल्पाचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महापालिकेकडे असलेल्या ठेवींमधून ₹36,623 कोटी प्रकल्पांसाठी वापरण्याचा निर्णय आहे, ज्यामुळे शहरातील विविध पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत मिळणार आहे.

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. Maharashtra State Road Transport Corporation (एसटी महामंडळ) कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकले आहे. निधीअभावी फेब्रुवारी महिन्यात थकीत वेतनवाढीचा हप्ता देणे कठीण झाले होते. मात्र राज्य शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याने हा प्रश्न मार्गी लागला. हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून शासनाच्या संवेदनशीलतेचे प्रतीक असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष Pratap Sarnaik यांनी सांगितले.

मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची सध्याची सदस्य संख्या २८६ असून, प्रत्येक राज्यसभेच्या जागेसाठी ३६ आमदारांचा मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी संख्याबळाचे काटेकोर गणित मांडण्यास सुरुवात केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा