India

जम्मू काश्मीरमध्ये सार्वजनिक शाळा, रस्ते आणि इमारतींना आता शहिदांची नावं

Published by : Lokshahi News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात भारत सरकारचं एक मोठं पाऊल. जम्मू , काश्मीरममध्ये प्रशासकीय परिषदेने शाळा, रस्ते आणि इमारतींमध्ये देशासाठी शहिद झालेल्या जवानांची आणि प्रतिष्ठित व्यक्तींची नावं दिली जाणार आहे. त्यावर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने गुरुवारी यावर मान्यता दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचा हा एक भाग असणार आहे.

तसेच बैठकीत उप राज्यपालांचे सल्लागार फारुख खान आणि राजीव राय भटनागर, जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव अरुणकुमार मेहता आणि उप राज्यपालांचे प्रधान सचिव नितीश्वर कुमार उपस्थित होते. दरम्यान जम्मू आणि काश्मीर सरकारने सांगितले, "केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा आणि विकासासाठी ज्यांनी बहुमोल योगदान दिलं आहे, त्यांचा आदर आणि सन्मान म्हणून, अनेक पायाभूत सुविधांना राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या लोकांची नावं देण्यात येतील." ज्यातून प्रगतीशील भारताची 75 वर्ष आणि या काळात लोकांनी मिळवलेलं यशाचा गौरव आहे. आणि हा महोत्सव भारतातील लोकांना समर्पित आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवचा अधिकृत प्रवास 12 मार्च 2021 पासून सुरू झाला होता आणि तो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरु असणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा