India

सार्वजनिक बँका विकणे मोठी चूक – रघुराम राजन

Published by : Lokshahi News

सार्वजनिक बँका खासगी उद्योगसमुहांना विकणं ही मोठी चूक ठरेल, असं मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. चालू पतधोरण व्यवस्थेत चलनवाढ रोखून आर्थिक वाढ साकार करण्याचं उद्दिष्ट आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. रोखे बाजारात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही राजन यांनी म्हटलं आहे.

भारतानं 2024-25 पर्यंत पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था साकार करण्याचं ठेवलेलं उद्दिष्ट महत्त्वाकांक्षी आहे. कोरोना संकटाच्या आधी हे लक्ष्य ठेवताना काळजी घेतली गेली नाही. पतधोरण हे चलनवाढ खाली आणू शकते यावर आपला विश्वास आहे. रिझर्व्ह बँकेला लवचिकता दिल्यास अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो, असंही राजन म्हणाले.

सध्याची व्यवस्था ही चलनवाड कमी ठेवण्यास उपयुक्त आहे. कोरोनामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था उर्जितावस्थेत आणण्यासाठी सरकारनं कर्जाच्या योजना आखल्या आहेत. तरीही एकूण आर्थिक स्थितीबाबत अनेक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा