India

बिस्कीट खाल्लं नाही तर मुलांच्या जीवाला धोका, बिहारमध्ये अफवेचं सावट…

Published by : Lokshahi News


एका प्रसिद्ध कंपनीचं बिस्कीट खाण्यावरून बिहारमध्ये सध्या एकच धुमाकूळ उठला आहे. या अफवेमुळे बघता बघता दुकानांमधील या कंपनीचा पूर्ण स्टॉक संपायला आला आहे. बिहारच्या सीतामंधी भागात ही अफवा पसरली होती. बिहारमध्ये या काळात जितीय पर्व सुरु असते . या पर्वात महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.

या उत्सवाच्या काळातच कोणीतरी अशी एफ अफवा पसरवली कि एका प्रसिद्ध कंपनीचे बिस्कीट नाही खाल्ले तर तुमच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल किंवा काहीतरी बरवाईट होईल. हि अफवा नेमकी कोणी उठवली कळू शकले नाही पण बघता बघता ही अफवा बिहारच्या अनेक गावांत पसरली .या अफवेची भीती इतकी होती कि लोकांनी हातातले काम सोडून दुकानाकडे धाव घेतली. किराणा दुकानाच्या बाहेर बिस्कीट घेण्यासाठी तौबा गर्दी उसळती अचानक इतके ग्राहक झाल्यामुळे दुकानांत असलेल्या या बिस्कीटांचा साठा देखील संपला . काहींनी यामागे नेमकं काय कारण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी या अफवेला सत्य समजून दुकानांमधून बिस्कीट खरेदी केलीच. सध्या या भागात ही अफवा चर्चेचा विषय बनली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा