Covid-19 updates

‘या’ जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद!

Published by : Lokshahi News

फेब्रुवारीत पुन्हा राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मंगळारी 6218 कोरोना रुग्ण आढळले तर 5869 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेय. तर, दुसरीकडे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद

जालना जिल्ह्यात मगंळवारी 117 रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना समितीची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर, 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी म्हंटलंय.कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अमंलबजावणीसाठी पथकांची स्थापना करण्यात आलीय.

जालन्यात मंगळवारी 117 नवे रुग्ण

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना जिल्ह्यात मंगळवारी 117 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरद्वारे 106 व्यक्तींचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 असे एकुण 117 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा