Covid-19 updates

‘या’ जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद!

Published by : Lokshahi News

फेब्रुवारीत पुन्हा राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मंगळारी 6218 कोरोना रुग्ण आढळले तर 5869 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेय. तर, दुसरीकडे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद

जालना जिल्ह्यात मगंळवारी 117 रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना समितीची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर, 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी म्हंटलंय.कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अमंलबजावणीसाठी पथकांची स्थापना करण्यात आलीय.

जालन्यात मंगळवारी 117 नवे रुग्ण

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना जिल्ह्यात मंगळवारी 117 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरद्वारे 106 व्यक्तींचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 असे एकुण 117 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."