India

Section 370 | दोन वर्षांत काश्मिरमध्ये काय बदल झालेत?

Published by : Lokshahi News

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्याच दिवशी २०१९ मध्ये काश्मिरचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला होता. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरला दोन केंद्रशासित प्रदेशात (जम्मू-काश्मीर आणि लडाख) विभागले. गुरुवारी या ऐतिहासिक निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली. या दोन वर्षात जम्मू-काश्मीरसंबंधी काही महत्त्वाचे बदल…

स्थानिक निवासी दर्जा : जम्मू-काश्मिरचा रहिवाशी बनण्याच्या नियमांमध्ये बदल करत इतर राज्यातील पुरुषांना याठिकाणी स्थायिक होण्याचा नियम करण्यात आला आहे.

जमीन खरेदी शक्य : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर बाहेरील लोकांना बिगर-कृषी योग्य जमीन खरेदी करण्याची मंजुरी दिली आहे. याआधी जम्मू-काश्मीरच्या लोकांनाच जमीन खरेदी करण्याची परवानगी होती.

सरकारी इमारतींवर तिरंगा : कलम-३७० हटवल्यानंतर २० दिवसांनी श्रीनगरच्या सचिवालयातून जम्मू-काश्मीरचा झेंडा काढून तेथे तिरंगा फडकवण्यात आला.

दगडफेक करणाऱ्यांना पासपोर्ट नाही : नुकतेच केंद्र शासित प्रदेश सरकारने आदेश जारी केलाय की, दगडफेक आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागी लोकांना पासपोर्ट दिला जाणार नाही. तसेच सरकारी नोकऱ्यांपासून त्यांना वंचित ठेवलं जाईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा