India

Sharad Pawar | दिल्लीतील भेटीनंतर पंतप्रधान मोदींना पवारांचे पत्र

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

जवळपास 50 मिनिटांच्या या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही तर सहकार मंत्रालय आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना आणखी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी सहकार मंत्रालयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्र हा राज्याचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केंद्राकडून कोणताही हस्तक्षेप हा संविधानाच्या नियमांचे उल्लंघन असेल, असे यामध्ये म्हणण्यात आलं आहे.

कायद्यातील तरतुदींमध्ये असलेल्या त्रुटींमुळे 97 वी घटनादुरुस्ती वादात असल्याचंही शरद पवार यांनी या पत्रात नमूद केलं आहे. अलिकडच्या काळात सहकारी बँकांच्या क्षेत्रात झालेल्या बदलाबाबत शरद पवार यांनी या पत्रामध्ये मुद्दे उपस्थित केले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा