India

Sharad Pawar | दिल्लीतील भेटीनंतर पंतप्रधान मोदींना पवारांचे पत्र

Published by : Lokshahi News

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहिले आहे.

जवळपास 50 मिनिटांच्या या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही तर सहकार मंत्रालय आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांबाबत चिंता व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर शरद पवार यांनी मोदींना आणखी एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी सहकार मंत्रालयाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्र हा राज्याचा विषय आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत केंद्राकडून कोणताही हस्तक्षेप हा संविधानाच्या नियमांचे उल्लंघन असेल, असे यामध्ये म्हणण्यात आलं आहे.

कायद्यातील तरतुदींमध्ये असलेल्या त्रुटींमुळे 97 वी घटनादुरुस्ती वादात असल्याचंही शरद पवार यांनी या पत्रात नमूद केलं आहे. अलिकडच्या काळात सहकारी बँकांच्या क्षेत्रात झालेल्या बदलाबाबत शरद पवार यांनी या पत्रामध्ये मुद्दे उपस्थित केले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी