Vidhansabha Election

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत म्हटलं की लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही. महायुतीच्या सरकारने सव्वा दोन वर्षात केलेली कामं लोकांनी पाहिली आहेत.

Published by : shweta walge

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता. याबाबत अंबरनाथमध्ये आलेले श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही टीका केली. "आता तुमचा परफॉर्मन्स कसा आहे? लोकांनी तुम्हाला पूर्णपणे नाकारलेलं आहे. ज्या लोकांनी अडीच वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती, ती अडीच वर्ष तुम्ही फक्त घरी बसले. अडीच वर्षात कोव्हीडच्या काळात किती भ्रष्टाचार केले, हे लोकांनी पाहिलेलं आहे. तर सव्वा दोन वर्षात महायुतीच्या सरकारने किती कामं केली, हे सुद्धा लोकांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं सरकार नाही. म्हणून कायमचं घरी बसवण्याचं काम लोकांनी करून टाकलेलं आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा