IND vs SL, ODI  Team Lokshahi
क्रीडा

टी-20 मालिका विजयानंतर भारतीय संघ वनडे मालिकेसाठी सज्ज

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली वनडे सीरिज 10 जानेवारीपासून सुरू होत आहे.

Published by : shamal ghanekar

भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन T-20 सामन्यानंतर आता एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्यापासून म्हणजे 10 जानेवारीपासून गुवाहाटी येथील बारसपारा क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे. तर दुसरा सामना 12 जानेवारीला ईडन गार्डन्स, कोलकाता आणि तिसरा सामना 15 जानेवारीला स्टेडियम आंतरराष्ट्रीय (ग्रेन) स्टेडियम, तिरुवनंतपुरम येथे खेळला जाणार आहे.

टी 20 मालिकेत विश्रांती घेतलेल्या सीनियर खेळाडूंचे एकदिवसीय मालिकेमध्ये पुनरागमन होणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचे पुनरागमन होणार आहे.

IND vs SL, ODI : एकदिवसीय सामन्यांसाठी दोन्ही संघ:

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

श्रीलंका संघ : दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, चारिथ अस्लंका, आशान बंडारा, वानिंदू हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, चमिका करुणारत्ने, लाहिरू कुमरा, दिलशान मदुशंका, पथुम निसांका, प्रमोद मदुशान, सामुना राजविरा, कासून, महाराणी, महाराणी, नुवानिंदू फर्नांडो, जेफ्री वँडरसे, ड्युनिथ वेलाल्गे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा