क्रीडा

टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का, शार्दुल ठाकूरला दुखापत

बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

Published by : Siddhi Naringrekar

बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा त्रास कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पहिल्या सामन्यात यजमान संघाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर टीम इंडियासमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त असल्याने तो दुसऱ्या वनडेत खेळण्याची खात्री नाही. शार्दुल ठाकूर फिट नसल्यास त्याच्या जागी उमरान मलिकला प्लेइंग 11 चा भाग बनवता येईल.

शार्दुल ठाकूरला पहिल्या वनडेत गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. शार्दुल ठाकूरच्या दुखापतीवर वैद्यकीय विभागाने लक्ष ठेवले आहे. संघ व्यवस्थापन शार्दुल ठाकूरला घेऊन कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही, त्यामुळे सामन्यापूर्वी त्याच्या खेळाबाबत निर्णय घेतला जाईल. शार्दुल 100 टक्के तंदुरुस्त नसेल तर त्याला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर ठेवले जाईल.

मोहम्मद शमीच्या दुखापतीनंतर संघात सामील झालेला उमरान मलिक खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. शार्दुल ठाकूर खेळत नसेल तर उमरान मलिकला प्लेइंग 11 चा भाग बनवण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलच्या फिटनेसबाबतही संघ व्यवस्थापनासमोर पेच निर्माण झाला आहे. अक्षर पटेलच्या फिटनेसबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अक्षर पटेल तंदुरुस्त झाल्यास तो शाहबाज अहमदच्या जागी प्लेइंग 11 मध्ये खेळेल. याशिवाय केएल राहुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. ऋषभ पंत बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग असेल की नाही हे देखील नंतर ठरवले जाईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?