Virat Kohli | Asia Cup 2022 team lokshahi
क्रीडा

विराट कोहली ठरणार आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवाचं कारण...

विराट कोहलीने केला मोठा खुलासा

Published by : Shubham Tate

Virat Kohli, Asia Cup 2022 : आशिया कप 2022 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर टीम इंडिया 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातही सर्व चाहत्यांच्या नजरा खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या विराट कोहलीवर असणार आहेत. विराट कोहली या मोठ्या सामन्याची तयारी करत आहे. दरम्यान, कोहलीने एक मोठा खुलासा केला आहे, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. (asia cup 2022 india vs pakistan virat kohli)

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवाचे कारण असेल. कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा सामना टीम इंडियासाठी लकी आहे. खरंतर हा कोहलीचा 100 वा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना आहे. कोहलीने जेव्हा 100 वा सामना किंवा डाव खेळला आहे तेव्हा भारताला फक्त विजयचं मिळाला आहे असं मागील आकडेवारी सांगत आहे.

विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे

विराट कोहली विश्रांतीनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनंतर त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच विराट कोहलीने खुलासा केला आहे की 10 वर्षात पहिल्यांदाच एक महिना बॅट उचलली नाही. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला, '10 वर्षांत पहिल्यांदा मी एक महिना माझी बॅट धरली नाही. माझ्या तीव्रतेचा थोडा गैरसमज होतोय हे माझ्या लक्षात आले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा