क्रीडा

RCB VS RR: बेंगळुरूचा प्रवास संपला! राजस्थान-हैदराबाद क्वालिफायर-2 मध्ये भिडणार

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर पडले.

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये, राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा चार गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतून बाहेर पडले. अशाप्रकारे बेंगळुरूचा सलग सहा सामने जिंकण्याचा प्रवासही संपला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने 19 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले.

अशा प्रकारे राजस्थानचा संघ क्वालिफायर-2 मध्ये पोहोचला. आता 24 मे रोजी दुसऱ्या बाद फेरीत त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ 26 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी फायनल खेळेल. या सामन्यापूर्वी बेंगळुरूने सलग सहा सामने जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. आता सलग 17 व्या हंगामात बेंगळुरू संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल आपले खातेही उघडू शकला नाही. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजयाचे नेतृत्व करणाऱ्या यश दयालने तीन षटकांत 37 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

बंगळुरूच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला ज्या प्रकारे मिठी मारली, त्यावरून असे मानले जात आहे की कार्तिकचाही हा आयपीएलमधील शेवटचा सामना होता. कार्तिकने यापूर्वी सीएसकेला पराभूत केल्यानंतर सांगितले होते की, सीएसकेविरुद्धचा सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा असेल असे त्याला वाटत होते. अशा स्थितीत कार्तिकची कारकीर्द संपल्याचे मानले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू