क्रिकेट

Champions Trophy 2025 : भारताचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, फायनलमध्ये प्रवेश

यावेळी ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले.

Published by : Team Lokshahi

भारताने हा सामना जिंकत विजय खेचत आणला आहे. ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखत भारताने विजय मिळवला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले होते. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. टीम इंडियाने साखळी फेरीतील तिनही सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने 1 सामना जिंकला. तर 2 सामने पावसामुळे रद्द झाल्याने 1-1 असे एकूण 2 गुण मिळाले आणि कांगारु उपांत्य फेरीत पोहचले. आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चांगली चुरस पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे आता भारताला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान मिळालं. यावेळी ऑस्ट्रेलियाने 265 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही जोडी मैदानात उतरली. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून सामन्याला सुरुवात केली. दरम्यान भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने दमदार खेळी करत भारताच्या धावांमध्ये मोठी मदत केली. मात 82 धावांवर विराट आऊट झाला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...