क्रिकेट

IND vs PAK: टीम इंडियाचा जबरदस्त विजय, पाकची फलंदाजी ठरली धुराडली!

विश्वचषकातील लीग लढतीत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. सुरुवातीलाच एक गडी बाद झाला तरी इशान किशनने डाव सावरला. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानचा डाव गुंडाळला

Published by : Riddhi Vanne

विश्वचषकातील लीग लढतीत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. सुरुवातीलाच एक गडी बाद झाला तरी इशान किशनने डाव सावरला. त्यानंतर गोलंदाजांनी कमाल करत पाकिस्तानचा डाव गुंडाळला आणि भारताने ६१ धावांनी शानदार विजय मिळवला. या यशासह टीम इंडिया सुपर ८ मध्ये पोहोचली आहे.

पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. आघाडीचे तीन फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात दोन बळी घेत सामना भारताच्या बाजूने झुकवला. उस्मान खानने ४४ धावा करत झुंज दिली, पण त्याला पुरेशी साथ मिळाली नाही.

भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा केला. बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनीही मोलाची साथ दिली. एकूणच, सर्वांगिण कामगिरीच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्ध्याला नमवले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा