क्रीडा

ENG vs IND 3rd Test : तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा

Published by : Lokshahi News

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे.

इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर भारताने आपल्या दुसऱ्या डावात झुंंजार वृत्तीचे दर्शन घडवत ८० षटकात २ बाद २१५ धावा केल्या आहेत. भारत अजूनही १३९ धावांनी पिछाडीवर आहे. केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी भारताची पिछाडी कमी केली. तिसऱ्या दिवसअखेर पुजारा १५ चौकारांसह ९१ तर विराट ६ चौकारांसह ४५ धावांवर नाबाद होते. उद्या म्हणजे चौथ्या दिवशी नेमक काय होत याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुढील २४ ते ४८ तासांसाठी विदर्भाला ऑरेंज अलर्ट

Pandharpur : पंढरपुरात सुरक्षा रक्षकाची दादागिरी! दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला अमानुष मारहाण

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी