क्रीडा

ENG vs IND : पहिल्याच सामन्यात भारताचा इंग्लंडकडून दारुण पराभव

इंग्लंडने 9 विकेट्सने सामना सहज जिंकला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघांमधील तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना शनिवारी चेस्टरली स्ट्रीटवर खेळवण्यात आला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करणाऱ्या भारतीय संघाला या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय महिला फलंदाज आणि गोलंदाज दोघेही अपयशी ठरले. अखेरीस इंग्लंडने 9 विकेट्सने सामना सहज जिंकला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 7 गडी गमावत 132 धावा केल्या. सलामीवीर स्मृती मानधना (23) आणि शेफाली वर्मा यांच्यात 30 धावांची भागीदारी झाली. यानंतर भारताच्या विकेट्स पडण्यास सुरूवात झाली. दीप्ती शर्माने नाबाद 29 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 20 आणि ऋषभ घोषने 16 धावा केल्या. इंग्लंडच्या स्फोटक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदजांना अधिक वेळ मैदानात राहता आले नाही. सारा ग्लेनने 4 षटकांत 23 धावा देत 4 फलंदाजांना माघारी पाठवण्यात यश मिळवले.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड संघ मैदानात उतरताच सुरुवात चांगली झाली. डॅनियल व्याट आणि सोफिया डंकले यांनी पहिल्या विकेटसाठी 38 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. 24 धावा केल्यानंतर व्याट बाद झाली. यानंतर फलंदाजीला आलेल्या एलिस कॅप्सीसह डंकलेने संघाला १३व्या षटकात लक्ष्यापर्यंत नेले. डंकलेने 44 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 61 धावा केल्या. कॅप्सीने 20 चेंडूत 32 धावांची खेळी खेळली. रेणुका सिंग वगळता सर्व भारतीय गोलंदाजांनी अर्थव्यवस्थेत १० पेक्षा अधिक धावा केल्या.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले की, संघाला ओल्या वातावरणात जबरदस्त खेळावे लागले. आम्ही अपेक्षेइतक्या धावा करू शकलो नाही. कारण परिस्थिती 100 टक्के खेळण्यास योग्य नव्हती. खेळाडूंना कधीही दुखापत होण्याची शक्यता होती. तरीही संघातील प्रत्येकाने आपले सर्वोत्तम दिले, असे तिने सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा