India Vs Bangladesh 1st test  Team Lokshahi
क्रीडा

पहिला कसोटी सामना, दिवसाखेर पुजारा-अय्यरने डाव सावरला, अशी आहे स्थिती

भारताची धावसंख्या 278/6 वर, श्रेयस अय्यर 82 धावांसह क्रिजवर

Published by : Sagar Pradhan

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. मात्र, या दौऱ्यात भारतीय संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्रामच्या झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला गेला. याच पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस संपला. भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. तर, श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे.

भारतने नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मैदानात आलेला भारतीय संघ खराब कामगिरी करताना दिसून आली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. मात्र, यानंतर चेतेश्वर पुजाराने डाव सावरला. त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली. 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला. त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test