WTC Final 2023 Team Lokshahi
क्रीडा

चौथ्या दिवसाचा खेळ संपला; WTC फायनल जिंकण्यासाठी आता भारताला 280 धावांची गरज

444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली.

Published by : Sagar Pradhan

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना ओव्हल मैदानात सुरू आहे. याच सामन्यातील आज चौथ्या दिवशी 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत भारताने 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. सध्या भारताकडून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे धुरा सांभाळत आहे. या दोघांही नाबाद 71 धावांची भागिदारी केली आहे.

आजचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारत विकेट फेकली. रोहित शर्मा 43 तर चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाले. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी विजयासाठी भारताला 280 धावांची गरज आहे. त्यामुळे आता उद्या कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीचा वाद मिटला; मानाच्या गणपतीची सकाळी 8 वाजता मिरवणुक होणार सुरू

Nagpur Marbat : मारबत मिरवणुकीसाठी नागपूर पोलिसांचा कडक बंदोबस्त; ड्रोन कॅमेऱ्यातून नजर

Monorail : मोनोरेल पुन्हा झाली ओव्हरलोड; 50 प्रवाशांना उतरवलं खाली

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज