WTC Final 2023 Team Lokshahi
क्रीडा

चौथ्या दिवसाचा खेळ संपला; WTC फायनल जिंकण्यासाठी आता भारताला 280 धावांची गरज

444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या दिवशी 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली.

Published by : Sagar Pradhan

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. हा सामना ओव्हल मैदानात सुरू आहे. याच सामन्यातील आज चौथ्या दिवशी 444 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत भारताने 3 बाद 164 धावांपर्यंत मजल मारली. सध्या भारताकडून विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे धुरा सांभाळत आहे. या दोघांही नाबाद 71 धावांची भागिदारी केली आहे.

आजचा चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली 44 धावांवर तर अजिंक्य रहाणे 20 धावांवर खेळत होते. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगल्या सुरुवातीनंतर खराब फटका मारत विकेट फेकली. रोहित शर्मा 43 तर चेतेश्वर पुजारा 27 धावांवर बाद झाले. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी विजयासाठी भारताला 280 धावांची गरज आहे. त्यामुळे आता उद्या कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा