क्रीडा

भारत – बांगलादेश सामना निघाला बरोबरीत

Published by : Lokshahi News

सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील भारत-बांगलादेशमधील सामना बरोबरीत निघाला आहे. दोन्ही संघाना १-१ चं गोल करता आला.

भारतासाठी १२१ वा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीने २७व्या मिनिटाला गोल करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरा पर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवली.नंतर बांगलादेशच्या विश्वनाथ घोषला ५४ व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आला आणि यामुळेच त्यांना १० खेळाडूसह खेळावे लागले. त्यानंतर येसिन अराफतने ७४ मिनिटाला बरोबरीचे गुण मिळवून दिले. आणि भारताचे आणि बांगलादेशचे प्रत्येकी एक-एक गुण मिळाले. सध्या गुणतालिकेत बांगलादेश चार गुणसह गटात अग्रस्थानी आहे तर भारत तिसऱ्या स्थानी आहे.

गुरुवार ७ ऑक्टोंबरला भारत आणि श्रीलंकेची स्पर्धा होणार असून नेमकी बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा