क्रीडा

Womens Asia Cup 2024: महिला आशिया कप टी-20 स्पर्धा सेमीफायनलमध्ये भिडणार भारत विरुद्ध बांग्लादेश

भारतीय महिला संघाची आज आशिया कप टी- 20 क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशशी गाठ पडेल.

Published by : Dhanshree Shintre

भारतीय महिला संघाची आज आशिया कप टी- 20 क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये बांगलादेशशी गाठ पडेल. या वेळी फायनल गाठण्याचे लक्ष्य बाळगूनच भारतीय संघ मैदानात उतरेल. भारताला शफाली वर्मा आणि स्मृती मनधाना यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. शफालीने आतापर्यंत तीन सामन्यांत 158 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत ती दुसऱ्या स्थानी आहे. हा सामना शुक्रवारी दुपारी 2 वाजता डंबुला येथे सुरू होईल, ज्याचे थेट प्रक्षेपण स्टारस्पोर्ट्स आणि हॉटस्टारवर केले जाईल.

महिला आशिया कप 2024 ची गतविजेत्या भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर बांगलादेशने श्रीलंकेविरुद्ध एक सामना गमावला आहे. महिला आशिया चषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात एकूण 4 सामने झाले असून ते अनिर्णित राहिले आहेत. 2018 च्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

भारतीय महिला क्रिकेट संघ आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याच्या मोहिमेवर आहे. त्याने वनडे फॉरमॅटमध्ये चार आणि टी-20 फॉरमॅटमध्ये तीन जेतेपदे पटकावली आहेत. महिला आशिया चषक 2004 मध्ये सुरू झाला आणि टीम इंडिया त्यावेळी चॅम्पियन बनली. 2008 पर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय स्वरूपात खेळली जात होती. त्याच वेळी, 2012 पासून तो टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला जात आहे. ही नववी आवृत्ती आहे आणि भारताने सात वेळा (2004, 2005, 2006, 2008, 2012, 2016, 2022) विजेतेपद पटकावले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा