India vs Ireland Team Lokshahi
क्रीडा

India vs Ireland : दीपक हुडाच्या दमदार खेळीने भारताचा 4 धावांनी विजय

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी-20 सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला.

Published by : shamal ghanekar

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी20 सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला. हा सामना अतीतडीचा होता. भारताने दुसऱ्या टी20 सामन्यामध्ये 226 धावांचे आव्हान आयर्लंड संघला देण्यात आले होते. हे आव्हान पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. ज्यामुळे दुसरा टी20 सामना भारताने 2-0 ने जिंकला आहे.

भारत आणि आयर्लंड सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून भारताने पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ईशान किसन लवकर बाद झाल्याने त्यानंतर दीपक हुडा (Deepak Hooda) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) या जोडीने धमाकेदार फलंदाजी केली. दीपकने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर संजूने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. या सामन्यामध्ये भारताचे कार्तिक, अक्षर आणि हर्षल हे तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. भारताचे संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावांचे आव्हान आयर्लंड संघासमोर ठेवण्यात आले होते.

जेव्हा आयर्लंड संघ 226 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले आणि त्यांनी सुरूवातीपासूनच चांगली कामगिरी करायला सुरुवात केली. पहिल्या सलामीवीर जोडीने 72 धावांची भागिदारी केली. त्यानंतर कर्णधार अँन्ड्रूयने 60 धावांची खेळी करून त्यानंतर तोही बाद झाला. तसेच हॅरी 39 धावा करुन बाद झाला. तर जॉर्जने नाबाद 34 धावा केल्या. पण हे आव्हान पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. त्यामुळे भारताने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Silver Rate : ग्राहकांची चिंता मिटली! लवकरच सोने-चांदीच्या भावात होणार मोठी घसरण; कधी ते जाणून घ्या

Chhagan Bhujbal : "अंतरवालीतील दगडफेक शरद पवारांच्या..." अंतरवालीतील दगडफेकीवर भुजबळांनी केला पडदाफाश

Jodha Akbar Rajat Tokas : छोट्या पडद्यावरील 'अकबर' एक वर्षापासून बेपत्ता! 'त्या' दुर्घटनेनंतर सगळ्यांशी तोडला संबंध, नेमकं प्रकरण काय?

Rahul Gandhi : चंद्रपूरच्या राजुऱ्यातही मतचोरी? राहूल गांधींचा दावा, भाजपाने फेटाळला आरोप