क्रीडा

India vs South Africa 1st Test, DAY 2 | पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास विलंब

Published by : Lokshahi News

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास विलंब होत आहे. दरम्यान दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या.

पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे भारताने वर्चस्व गाजवलं होतं. दिवसअखेरीस भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या होत्या. सलामीवीर केएल राहुलने शानदार शतक झळकावल असून तो (122) धावांवरुन आज डाव पुढे सुरु करेल. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणे (साथ देईल. रहाणे (40) धावांवर नाबाद आहे.

मयांक अग्रवाल आणि राहुलने काल पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी केली. त्यांच्या दमदार सलामीमुळे भारताला पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवता आलं. मयांकला (६०) धावांवर निगीडीने पायचीत केले. कर्णधार विराट कोहलीला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो (35) धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा भोपळाही न फोडता आल्यापावली माघारी परतला.

दरम्यान दुसरा दिवसाचा खेळ सूरू झाला आहे. पावसामुळे नियोजित वेळेत सामना सुरु होऊ शकलेला नाही. सध्या पाऊस थांबला असून मैदान सुकवण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे थोडा उशिराने सामना सुरु होईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू