क्रीडा

IND vs SL: भारताने सलग दुसरा T20 सामना जिंकला; श्रीलंकेचा 7 गडी राखून केला पराभव

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवत 7 गडी राखून विजय मिळवला.

Published by : Dhanshree Shintre

रविवारी, 28 जुलै रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवत 7 गडी राखून विजय मिळवला. भारत आणि श्रीलंका यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना काल 28 जुलैला खेळला गेला. या मालिकेतील तिसरा सामना 30 जुलै रोजी होणार आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाने कुसल परेराच्या 54 धावांच्या झंझावाती खेळीमुळे 20 षटकांत 9 गडी गमावून 161 धावा केल्या. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी टीम इंडियाची ओपनिंग जोडी मैदानात उतरली मात्र, 6 रन्स करताच पावसामुळे मॅच रोखण्यात आली. अखेर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, टीम इंडियाला विजयासाठी 78 रन्सचं आव्हान देण्यात आलं. टीम इंडियाला देण्यात आलेलं हे आव्हान अगदी सहज गाठलं आणि श्रीलंकेला पराभूत केलं. टीम इंडियाने या विजयासोबतच टी-20 सीरिज 2-0ने आपल्या खिशात घातली. टीम इंडियाने 6.3 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावत 81 रन्स केले आणि मॅच जिंकली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Maratha Protest : आंदोलन संपलं! नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी आलेल्या शिदोरीचा पुर; उरलेल्या अन्नाचं काय केलं?

Donald Trump vs PM Modi : ट्रम्प यांची भारताच्या टॅरिफ धोरणावर टीका; अमेरिकन आयात शुल्क कमी करण्याची तयारी

Ajit Pawar On Manoj Jarange Maratha Protest : 'मराठा समाजाच्या अपेक्षांना न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न'- अजित पवार

Latest Marathi News Update live : भारताचं टॅरिफ जगातील इतर देशांपेक्षा सर्वाधिक ट्रम्प यांचा दावा