India Vs Sri Lanka 3rd Odi Team Lokshahi
क्रीडा

श्रीलंकेला क्लीन स्वीप, तिसऱ्या वनडेत भारताचा दणदणीत विजय

भारताच्या 390 धावाच पाठलाग करताना अवघ्या, 73 धावांवर श्रीलंकेचा संघ तंबूत परतला.

Published by : Sagar Pradhan

भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. यामध्ये भारताने तीन सामान्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून आधीच मालिका आपल्या नावे केली आहे. परंतु, आज या दोन्ही संघात औपचारिक शेवटचा एकदिवसीय सामना पार पडला. याच सामन्यात भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. भारताच्या 390 धावाच पाठलाग करताना अवघ्या, 73 धावांवर श्रीलंकेचा संघ तंबूत परतला. त्यामुळे श्रीलंकेचा 371 धावांनी पराभव झाला. या विजयासह भारताने श्रीलंकेला क्लीनस्वीप दिला आहे. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे भारताचा श्रीलंकेवर विजय सोपा झाला.

आजच्या या सामन्यात विराट प्रचंड आक्रमक भूमिकेत दिसला. विराटने श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगेलाच घाम फोडला. विराटनं 110 चेंडूत नाबाद 166 केला तर शुभमन गिलनं 116 धावांची खेळी केली. सर्वात आधी कर्णधार रोहित 46 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर कोहलीने गिलसोबत डाव सावरला. ज्यामुळे भारताने 50 षटकांत 390 धावा करत 391 धावांचे टार्गेट श्रीलंकेला दिले. 391 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेच्या फलंदाजाना चांगलीच कसरत करावी लागली. ज्यामुळे दुसऱ्या ओव्हरपासून त्यांचे गडी बाद होण्याचं सत्र सुरु झालं. ज्यानंतर 22 ओव्हरमध्ये 73 धावा करुन संपूर्ण संघ तंबूत परतला आणि भारतानं तब्बल 317 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...

Asia Cup 2025 IND vs PAK : हस्तांदोलन वादावरून पाकिस्तानचा संताप उफाळला! आयसीसीसमोर ठेवले अल्टिमेटम

Beed Govind Barge : माजी उपसरपंच आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट! नर्तिका पूजा गायकवाडला गायकवाडला न्यायालयीन कोठडी