India Vs Sri lanka 2nd Odi Team Lokshahi
क्रीडा

दुसऱ्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर विजय, सामना जिंकून मालिका केली नावी

राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला.

Published by : Sagar Pradhan

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय निर्णायक सामना पार पडला. एकापाठोपाठ दुसऱ्या सामन्यात भारताने जोरदार विजय मिळवला आहे. या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला आहे. राहुलच्या आणि पांड्याच्या खेळीमुळे हा विजय भारतीय संघाच्या पारड्यात पडला.

या सामन्यात नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर 215 धावा करत 216 धावांचं लक्ष्य त्यांनी भारतीय संघाला दिलं. परंतु, फलंदाजीसाठी उतरलेला भारतीय संघातील वरची फळी सोप्यात बाद झाली. त्यामुळे हा सामना रंगतदार झाल्याचे पाहायला मिळाले. अखेर राहुलच्या संयमी अर्धशतकाने सामना भारताने जिंकला. पांड्यानेही राहुलला चांगली साथ दिली. ज्यामुळे भारताने 6 गडी गमावत 43.2 षटकात निर्धारीत लक्ष्य पूर्ण केले. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत भारताने दोन सामने जिंकल्यामुळे भारताने ही मालिका आपल्या नवी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Shirsat Viral Video : पैशांनी भरलेल्या बॅगेसोबत संजय शिरसाट; 'त्या' Viral Video बाबत स्पष्टचं म्हणाले...

Panvel : पनवेलमध्ये उभारणार विज्ञानप्रेमींसाठी अद्वितीय अंतराळ संग्रहालय

Latest Marathi News Update live : 50 खोक्यांमधील एक खोका आज दिसला, संजय शिरसाटांच्या व्हिडिओवरून आदित्य ठाकरेंचा टोला

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस