ICC T20 U19 World Cup 
क्रीडा

ICC U19 T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताच्या महिला संघाने पुन्हा जिंकला आयसीसी U19 टी-20 वर्ल्ड कप

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी U19 टी-20 वर्ल्ड कप जिंकला. गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला.

Published by : Gayatri Pisekar

क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा आयसीसी अंडर 19 गटातील महिला टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. मलेशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही. 2023 मध्ये झालेल्या पहिल्या हंगामात इंग्लंडचा पराभव करून भारताने विजेतेपद पटकावले होते.

फायनल सामन्यात, दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या दडपणाखाली त्यांचा डाव 20 षटकांत 10 बाद 82 धावांवर संपला. भारताकडून गोंगाडी त्रिशा ने 4 षटकांत 15 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तसेच वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. शबनम शकीलने एक विकेट घेतली.

83 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने सुरुवात चांगली केली. मात्र, 36 धावांवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर गोंगाडी त्रिशा आणि सानिका चाळके यांनी संघाला विजय मिळवून दिला. भारताने या सामन्यात 9 विकेट्स आणि 52 चेंडू राखून विजय मिळवला. त्रिशाने नाबाद 44 धावा केल्या, तर सानिकाने नाबाद 26 धावांचे योगदान दिले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी