क्रीडा

Ind Vs Eng 4th Test | भारताचा १५७ धावांनी ऐतिहासिक विजय; मालिकेतील २-१ ने आघाडी

Published by : Lokshahi News

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांचा दमदार कामगिरीने इंग्लंडच्या हातून हा विजय खेचून आणला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. जसप्रीत बुमराहने २, रवींद्र जडेजाने २, शार्दुल ठाकूरने २, तर उमेश यादवने २गडी बाद केला. इंग्लंडकडून हसीब हमीदने ६३, तर बर्न्सने ५० धावांची खेळी केली. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवाल होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक