क्रीडा

Ind Vs Eng 4th Test | भारताचा १५७ धावांनी ऐतिहासिक विजय; मालिकेतील २-१ ने आघाडी

Published by : Lokshahi News

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारताने १५७ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांचा दमदार कामगिरीने इंग्लंडच्या हातून हा विजय खेचून आणला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

शेवटच्या दिवशी इंग्लंडला २९१ धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात २१० धावा करू शकला. जसप्रीत बुमराहने २, रवींद्र जडेजाने २, शार्दुल ठाकूरने २, तर उमेश यादवने २गडी बाद केला. इंग्लंडकडून हसीब हमीदने ६३, तर बर्न्सने ५० धावांची खेळी केली. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

या सामन्यापूर्वी ओव्हल मैदानावर टीम इंडियाला गेल्या ५० वर्षात एकही कसोटी सामना जिंकता आलेला नव्हता. भारताने १९३६ ते २०१८ या काळात १३ कसोटी सामने या मैदानावर खेळले आहेत. त्यापैकी ५ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. ७ सामने भारताने गमावले होते, तर फक्त १ सामन्यात विजय मिळवला होता. या मैदानावर १९७१ साली भारताने एकमेव आणि अखेरचा विजय मिळवाल होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा