क्रीडा

मायदेशी खेळवला जाणार का IPL चा १५ वा हंगाम?

Published by : Lokshahi News

देशात कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता, यंदाचा IPL हंगाम देखील भारतात खेळवला जाण्याची शक्यता कमीच दिसते आहे.

सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ स्वभूमीत परतेल व अवघ्या काही दिवसांतच IPL च्या १५व्या हंगामाला सुरूवात होईल. परंतू, ह्याच काळात देशामध्ये काेराोनाची तिसरी लाट देखील पसरली असेल. त्यामुळे, बीसीसीआय सध्या पर्यायी व्यवस्था म्हणून प्लॅन बी वर काम करत आहे.

२०२१ मधील IPL चा हंगाम देखील काेराेनामूळे मध्येच स्थगित करावा लागला हाेता व उर्वरित हंगाम UAE मध्ये खेळवला गेला हाेता. यंदाचा IPL चा हंगाम भारतात खेळवण्याचा विचार असला तरी काेराेनाची तिसरी लाट आल्यास हा हंगाम देखील देशाबाहेर खेळवावा लागेल असे चित्र दिसत आहे.

यंदाचा हंगाम हा खास असणार आहे कारण, एकूण संघांची संख्या ही ८ वरून १० करण्यात आली आहे. तसेच यंदा मेगा लिलाव देखील असणार आहे. जर काेराेनामूळे IPL परदेशी आयाेजित करावी तर, बीसीसीआय ची पहिली पसंती दक्षिण आफ्रिकेला असेल, असे सूत्रांकडकडून समजले आहे. त्याचबराेबर क्षीलंका हादेखील एक पर्याय असेल.

"भाजप सरकारच्या नादानपणामुळे भारतीय सैनिकांवर हल्ला झाला"; 'मशाल' पेटवून उद्धव ठाकरेंचं PM मोदींवर शरसंधान

IPL 2024 : धरमशाला मैदानात चेन्नई बनला सुपर 'किंग'! पंजाबचा केला दारुण पराभव

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा