IND VS WI | Team India | KL Rahul
IND VS WI | Team India | KL Rahul team lokshahi
क्रीडा

IND VS WI : टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू 3 टी20 मॅंचपासून बाहेर, आता खेळणार...

Published by : Shubham Tate

KL Rahul : टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आयपीएल 2022 पासून क्रिकेटपासून दूर आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी केएल राहुलला दुखापत झाल्याने त्याला शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला जावे लागले. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेपूर्वी कोरोना झाला आणि आता असे मानले जात आहे की तो पहिल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये खेळणार नाही. (kl rahul set to miss first 3 t20i vs west indies ind vs wi series)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल पहिल्या तीन वनडेत खेळणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका २९ जुलैपासून सुरू होत आहे. पहिले तीन T20 त्रिनिदाद आणि नंतर सेंट किट्समध्ये खेळवले जातील. या मालिकेतील शेवटचे दोन टी-20 सामने अमेरिकेतील लॉडरहिल येथे होणार आहेत.

केएल राहुलला लॉडरहिल येथे होणार्‍या केवळ 2 टी-20 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी हवी आहे. केएल राहुलनेही लॉडरहिलमध्ये टी-20 शतक झळकावले आहे. 2016 मध्ये केएल राहुलने लॉंडरहिल येथे 51 चेंडूत 110 धावा केल्या होत्या.

भारतीय T20 संघाचे सदस्य त्रिनिदादला पोहोचले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, आर अश्विन, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार हे टी-20 मालिकेसाठी संघाशी संबंधित आहेत. या सर्व खेळाडूंना वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्याचबरोबर कुलदीप यादवही तंदुरुस्त झाल्यानंतर टीम इंडियात परतला आहे.

टी-२० मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, केएल राहुल, डी. , ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, आवेश खान, हर्षल पटेल.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...