क्रीडा

Ind Vs Ban: पावसाने भारताची चिंता वाढवली, DLS नियमानुसार बांग्लादेश 17 धावांनी पुढे

Published by : Sagar Pradhan

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्थ येथे झालेल्या पराभवानंतर, आज बुधवारी अॅडलेड ओव्हलवर बांग्लादेशविरुद्ध लढत असताना भारताला विजयी मार्गावर परतायचे आहे. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्हा संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. परंतु आता भारत आणि बांग्लादेश यांच्यामधील सामना पावसामुळे थांबला आहे. भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे बांग्लादेश DLS पद्धतीच्या आधारे 17 धावांनी पुढे आहे. बांग्लादेशचा सलामीवीर लिटन दासने भारताविरुद्ध 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अवघ्या 21 चेंडूत अर्धशतक झळकावून बांग्लादेशला धडाकेबाज सुरुवात करून दिली. तत्पूर्वी, विराट कोहलीने 44 चेंडूत 64 धावा केल्यामुळे भारताने अॅडलेडमध्ये सुरू असलेल्या गट 2 च्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध 6 बाद 184 धावा केल्या.

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश; अंधारेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; म्हणाले...

Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Rahul Gandhi : रायबरेलीतून राहुल गांधी यांना उमेदवारी जाहीर