क्रीडा

T20 World Cup: सेमीफाइनलमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्या दु:खात म्हणाला,धक्का बसला...

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 गडी राखून टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर तो निराश झाला आहे.

Published by : shweta walge

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या टी-20 वर्ल्ड कप 2022 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून 10 गडी राखून टूर्नामेंटमधून बाहेर पडल्यानंतर तो निराश झाला आहे. T20 विश्वचषक 2022 स्पर्धेतून रिकाम्या हाताने गेल्यानंतर हार्दिक पांड्याने असे विधान केले आहे की 'धक्का बसला, दुखावलो आहे, निराश आहे'.

हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 63 धावांची शानदार खेळी खेळून भारताला 6 बाद 168 धावांपर्यंत मजल मारता आली पण इंग्लंडने हे लक्ष्य 16 षटकात पूर्ण केले. हार्दिक पांड्याने ट्विट केले की, 'निराश आहे, दुखावलो आहे, धक्का बसला.'

हार्दिक पांड्या म्हणाला, 'हा निकाल स्वीकारणे आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. आम्ही आमच्या सहकारी खेळाडूंसोबतच्या नात्याचा पुरेपूर आनंद घेतला आहे, आम्ही प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसाठी लढलो. आमच्या समर्थन कर्मचार्‍यांच्या अनेक महिन्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद.

हार्दिक पांड्याने लिहिले, 'आमच्या चाहत्यांचे आभार, ज्यांनी आम्हाला सर्वत्र पाठिंबा दिला, आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत. असे व्हायचे नव्हते, पण आम्ही लढा सुरूच ठेवू. भारताचा पुढील दौरा न्यूझीलंडची मर्यादित षटकांची मालिका आहे, ज्यामध्ये संघ 18 नोव्हेंबरपासून तीन T20 आंतरराष्ट्रीय सामने आणि अनेक एकदिवसीय सामने खेळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

Nepal Finance Minister Beaten By Protesters : नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण! अर्थमंत्र्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video Viral

WhatsApp Web Down : लॅपटॉप-PC वर WhatsApp स्क्रोलिंग अडकतंय? माऊस आणि सिस्टममध्ये खराबी नाही तर...

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : कोळी बांधवांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार! लालबागचा राजा विसर्जन वादावर मंडळाकडून पहिली कारवाई