क्रीडा

Tokyo 2020 । टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी ‘या’ स्पर्धा होणार

Published by : Lokshahi News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी उद्याचा म्हणजेच 31 जुलैचा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारत तिरंदाजी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, हॉकी, निशानेबाजी, सेलिंग अशा खेळांमध्ये भाग घेणार आहे. यामध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी आणि निशानेबाजी या खेळांमध्ये भारताल पदक मिळण्याच्या सर्वाधिक आशा आहेत.

टोक्यो ओलिम्पिक ही मानाची स्पर्धा आता मध्यांतरावर पोहचली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत टोक्यो ओलिम्पिकमध्ये 2 पदकांवर नाव कोरलं आहे. भारतीय खेळाडूंनी काही खेळात केलेल्या अप्रतिम खेळांमुळे आणखी पदकं मिळण्याची शक्यता आहे. या सर्वामध्ये बॅडमिंटन, तिरंदाजी आणि निशानेबाजी या खेळांमध्ये भारताल पदक मिळण्याच्या सर्वाधिक आशा आहेत.

अतनु दास आणि सिंधूवर सर्वांची नजर

पुरुष तिरंदाजीमध्ये भारताचा अतानु दास पुरुष एकेरीमध्ये प्री क्वॉर्टरचा सामना खेळतील. यावेळी त्याचा सामना जपानच्या तिरंदाजाशी होईल. पुरुष एकेरीसह भारतीय तिरंदाज टीम इवेंटमध्ये सहभाग घेणार आहेत. महिलांमध्ये बॅडमिंटन एकेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधू सेमीफायनलचा सामना खेळेल. तसेच निशानेबाजीमध्ये अंजुम मौदगिल आणि तेजस्विनी सावंत सहभाग घेणार आहेत. तर बॉक्सिंगमध्ये बॉक्सर अमित पंघाल सामना खेळताना दिसेल.

महिला हॉकी संघाला विजय अनिवार्य

भारतीय महिला हॉकी संघाला 31 जुलैचा दिवस महत्त्वाचा आहे. उपांत्य पूर्व फेरीत पोहोचण्यासाठी शनिवारचा दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धचा सामना खेळणं महत्त्वाचं आहे. भारताला विजयासह आयर्लंड संघाला त्यांचा ग्रुपमधील सामना पराभूत होणंही भारतासाठी पुढील फेरीत पोहचण्यासाठी महत्त्वाचं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय