टीम इंडियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव झाला. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्याने पाकिस्तानची टीम सेमीफायनल पर्यंत तरी पोहचणार अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तान टीमचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने प्रतिकिया दिली आहे. तो म्हणाला की, चुकीची फिल्डींग आणि चुकीच्या निर्णयामुळे हा पराभव झाला असून शोएब मलिकला टीममध्ये घ्यायला काय अडचण होती असा प्रश्न त्याने विचारला आहे.
यासोबतच मी जर का कर्णधार असतो. तर शोएब मलिकला माझ्या टीममध्ये नक्की संधी दिली असती. मॅच कशी जिंकता येईल किंवा चषक कसा जिंकता येईल यासाठी मी काहीही केलं असतं. मग त्यासाठी गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता असं विधान त्याने केलं आहे. त्याच्या या विधानाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.