Commonwealth Games 2022 | Mirabai Chanu
Commonwealth Games 2022 | Mirabai Chanu  team lokshahi
क्रीडा

Mirabai Chanu : 2014 मध्ये पहिले पदक जिंकले, जाणून घ्या मीराबाई चानूंचा रंजक इतिहास

Published by : Team Lokshahi

CommonwealthGames2022 : भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने बर्मिंगहॅममध्ये नवा इतिहास रचला आहे. तीने दुसऱ्यांदा देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. जाणून घ्या मीराबाई चानूच्या आयुष्याबद्दल- भारताची पहिली महिला वेटलिफ्टर मीराबाई चानूने शनिवारी, 30 जुलै 2022 रोजी सलग दुसऱ्यांदा नवा इतिहास रचला आहे. (weightlifter mirabai chanu lands india the first gold medal in the commonwealth games 2022)

चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. दुसऱ्यांदा भारताच्या झोळीत सुवर्णपदक टाकले आहे. याआधी चानूने 2018 मध्ये गोल्ड कोस्टमध्ये अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते. तिने 2014 मध्ये ग्लासगो येथे रौप्य पदक जिंकले आणि त्यानंतर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 49 किलो गटात रौप्य पदक जिंकले. भारतासाठी वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक आणि रौप्य पदक जिंकणारी ती पहिली महिला आहे.

लाकडापासून सुरू झाला प्रवास, आज सुवर्ण जिंकले

साईखोम मीराबाई चानू यांचा जन्म 8 ऑगस्ट 1994 रोजी भारताच्या ईशान्येकडील राज्य मणिपूरची राजधानी इंफाळ येथे झाला. त्याच्या आईचे नाव सायकोहान उंगबी टॉम्बी लिमा असून त्या व्यवसायाने दुकानदार आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव सायकोहॅम कृती मीतेई असे असून ते पीडब्ल्यूडी विभागात काम करतात. मीराबाई चानू यांना लहानपणापासूनच वेटलिफ्टिंगची आवड होती. वयाच्या 12 व्या वर्षी त्या लाकडाचे जाड बंडल उचलण्याचा सराव करत असे. वेटलिफ्टिंगचे स्वप्न पाहणाऱ्या चानूने आज सिद्ध केले आहे की कठोर परिश्रम आणि समर्पणाने सर्वात मोठे यश साध्य करता येते.

कुंजुरानी देवी यांच्या प्रेरणेने

मीराच्या घरात लाकडी चुलीवर अन्न शिजवले जायचे आणि तिला जंगलातून लाकडे आणावी लागायची. चानू ते मोठे बंडलही सहज उचलत असे जे तिचा भाऊ क्वचितच उचलू शकत असे. मीराबाईंना महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. कुंजुरानीही मणिपूरचीच होती आणि ती अथेन्स ऑलिम्पिकमध्ये खेळली होती. त्यांना पाहून मीरानेही तिच्या कुटुंबीयांना वेटलिफ्टिंगमध्ये करिअर करण्यास सांगितले. सुरुवातीला सगळ्यांनाच राग आला आणि सगळ्यांनी नकार दिला पण शेवटी मीराच्या आग्रहापुढे नमते घ्यावे लागले.

2014 मध्ये पहिले पदक जिंकले, इतिहास रचला

मीराबाई चानूने 2014 मध्ये ग्लासगो येथे 48 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून पहिले राष्ट्रकुल क्रीडा पदक जिंकले. त्यानंतर 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती अयशस्वी ठरली होती. पण दोन वर्षांनंतर, 2017 च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदकासह पुनरागमन केले. गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पण तिची खरी परीक्षा २०२१ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये आली जेव्हा ती तिच्या मागील ऑलिम्पिक पराभवातून रौप्यपदक जिंकून परतली आणि रौप्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर बनली. सिडनी ऑलिम्पिक 2000 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कर्णम मल्लेश्वरीनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती देशातील दुसरी वेटलिफ्टर आहे.

CSK vs RCB : सामन्यात पावसाने खोडा घातल्यास बंगळुरुच्या अडचणी वाढणार? काय आहे समीकरण? जाणून घ्या

"२० तारखेला निवडणूक होऊद्या, २१ तारखेला मिटिंग लावतो आणि..."; नाशिकच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

Carrom: कॅरम खेळल्याने होतात हे शारीरिक फायदे! जाणून घ्या...

Chess: बुद्धिबळ खेळण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या...

भारताचा स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं केली निवृत्तीची घोषणा; BCCI ने शेअर केली 'ही' खास पोस्ट