India

तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये १० जणांना जिवंत जाळले

Published by : Jitendra Zavar

पश्चिम बंगालमधील (West Bangal) बीरभूम जिल्ह्यातील दुर्देवी घटना समोर आली आहे. रामपूरहाट येथे टीएमसी (TMC)नेता भादू शेख यांच्या हत्येनंतर टीएमसी कार्यकर्ते संतप्त झाले आणि परिसरात हिंसाचार (violent)पसरला. त्यांनी 10-12 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत 10 जण जिवंत जळाल्याची माहिती आहे. यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री घडली आहे. यामध्ये 10-12 घरे जळाली आहेत. एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाच घरातून 7 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. कथितपणे रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर जमावाकडून घरे पेटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

भादू शेख तृणमूल काँग्रेसचे नेते होते. त्यांच्यांवर बाँबने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...