Vidhansabha Election

विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीचं ट्विट; संजय राऊत म्हणाले...

विधानसभा निवडणुकीच्या उद्या निकाल लागणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीच्या उद्या निकाल लागणार आहे. या निकालाआधी वंचित बहुजन आघाडीने ट्विट करत म्हटले आहे की, जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळाले, तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊ.आम्ही सत्ता निवडू ! आम्ही सत्तेत राहायला निवडू !

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे लोकशाही माननारे नेते आहेत. त्यांचे जर 50 - 60 आमदार निवडून येत असतील आणि गरज लागली 50 - 60 आमदारांची तर आम्ही नक्की आणि प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत. आम्ही नक्की त्यांचा विचार करु.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकसभेलासुद्धा आम्ही प्रयत्न केला ते आमच्याबरोबर राहावेत. विधानसभेसाठी आम्ही आंबेडकर साहेबांचा विचार केला. त्यांचे म्हणणे आहे ज्यांनी सत्ता येणार त्यांच्याबरोबर राहणार, आमची सत्ता येत आहे. त्याच्यामुळे आंबेडकर साहेब आमच्याबरोबर नक्की राहतील. असे संजय राऊत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय