नवी मुंबईमधून चालत्या गाडीला आग लागल्याची घटना घडली आहे. ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर पहाटे 6 वाजता चालत्या चारचाकीने पेट घेतला. चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कोणतीही जीवीतहानी जखमी झाले नाही. अग्नीशमन दलांच्या जवनांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.