अबू आझामी यांनी सरकारला माफीनामा दिला आहे. अबू आझामी म्हणाले की, "माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला. औरंगजेब रहमतुल्लाह अलेहबद्दल मी तेच म्हटले आहे जे इतिहासकार आणि लेखकांनी म्हटले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा इतर कोणत्याही महापुरुषांबद्दल कोणतेही अपमानजनक भाष्य केलेले नाही. परंतु तरीही जर माझ्या शब्दांमुळे कोणी दुखावले असेल तर मी माझे शब्द, माझे विधान मागे घेतो." असे अबू आझामी यांनी म्हटले आहे.